- Privacy Policy
- Terms and Conditions
खेळाचे महत्व निबंध मराठी | Khelache Mahatva in Marathi Essay
खेळाचे महत्व निबंध मराठी – khelache mahatva in marathi essay.
अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ यांनाही महत्त्व आहे. मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच मुलांचा, शारीरिक विकासही झाला पाहिजे. व्यायाम, खेळ शारीरिक विकास करतात तर शिक्षण, चिंतन, मननामुळे व्यक्तीचा मानसिक विकास होतो. खेळांची अनेक रूपे आहेत. काही खेळ मुलांसाठी, काही मोठ्यांसाठी तर काही वृद्धांसाठी असतात. काही खेळ खेळण्यासाठी मोठी मैदाने लागतात. काही खेळांना मात्र लागत नाहीत. घरातल्या घरात खेळले जाणारे करम, पत्ते, बुद्धिबळं, सोंगट्या या खेळांमुळे मनोरंजन व बौद्धिक विकास होतो.
‘स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो” जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो.
मनुष्याला जे धडे शिक्षण शिकवू शकत नाही ते खेळाचे मैदान शिकविते. उदा, खेळ खेळताना शिस्त पाळावी, नेत्याच्या आज्ञेचे पालन करावे, खेळात विजयाच्या वेळी उत्साह असावा पण हार झाली तरी बदल्याची भावना नसावी. मुलांच्या किशोरावस्थेपासूनच त्यांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळू दिले पाहिजेत. त्यांना संघर्षासाठी तयार केले पाहिजे. म्हणजे ते भविष्यातही यशस्वी होतील. विश्व विक्रम करून आपला आणि देशाचा गौरव ते वाढवितील. सांघिक खेळांमुळे संघभावना व जबाबदारीची जाणीव होते.
खेड्यांतील आणि शहरांतील खेळात फरक असतो. खेड्यांतली मुले विटीदांडू, कबड्डी, गोट्या खेळतात. तर शहरातील मुले क्रिकेट , बॅडमिंटन , टेबल टेनिससारखे खेळ खेळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे खेळांची मैदाने कमी होत आहेत. खेळांडूसाठी खेळाचे मैदान मोठे आणि हवेशीर असले पाहिजे. त्यांनी हिरव्या भाज्या, दूध, फळे आदींचे सेवने केले पाहिजे. स्वच्छ वातावरणात राहिले पाहिजे. हे शरीर ईश्वराची देणगी आहे. त्याला निरोगी ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी खेळ, व्यायाम, आणि शिक्षण आवश्यक आहे. शाळेमध्ये खेळांत भाग घेण्यास उत्तेजन दिले पाहिजे.
खेळाचे महत्व निबंध मराठी – Khelache Mahatva Nibandh Marathi
आम्हा लहान मुलांना खेळायला खूप आवडते. आम्हाला मुळी हे सारे जगच नवे असते, त्यातच आमच्या शरीराचीही दिसामासा वाढ होत असते. ही वाढ होत असताना आमच्या शरीरात प्रचंड उर्जा ठासून भरलेली असते. त्या उर्जेचा निचरा होण्यासाठी आम्हा मुलाला खेळायला मिळाले पाहिजे, भरपूर खेळायला मिळाले पाहिजे. पण आजकाल तसे होत नाही. कारण आजकाल आम्ही राहातो त्या सोसायटीत खेळायला जागा नसते, आसपास मैदाने किंवा बागा नसतात. मग घरात बसून टीव्ही पाहाणे किंवा मोबाईलवर खेळ खेळणे ह्यात आम्हाला आमचा वेळ घालवावा लागतो. त्यातच भर म्हणून शाळा लांब असल्याने रोज दोन दोन तास शाळेत जाण्यायेण्यातच वाया जातात.
शिवाय अभ्यास, शिकवणी ह्या सगळ्या रगाड्यातून वेळ मिळाला तर आम्ही मैदानावर जाणार ना? अर्थात् मी मुंबईत राहातो म्हणून मुंबईतले सांगतो आहे. इतर ठिकाणी मुलांना खेळायला मिळत असेलच. माझ्या बाबांना ह्याची जाणीव असल्यामुळे ते आम्हाला दर सुट्टीत फुटबॉलच्या प्रशिक्षणाला पाठवतात. त्याशिवाय दर रविवारी त्यांच्यासोबत आम्हाला पोहायला घेऊन जातात. कधीकधी बॅडमिंटनचे कोर्ट बुक करून आम्ही सोसायटीतील मुले तिथे खेळायला जातो.सायकलही चालवतो.
माझ्या बाबांचे सांगणे असे आहे की मुलांना खेळाची आवड लावली की ती बहकत नाहीत, वाममार्गाला लागत नाहीत. म्हणून सर्वच मुलांना खेळायला मिळाले पाहिजे.
मुलांनीच नव्हे तर मोठ्यांनीही खेळले पाहिजे. कारण त्यामुळे व्यायाम घडतो. सर्व स्नायू लवचिक होतात. हृदयाचे स्नायूही बळकट झाल्यामुळे हृदयविकारासारखा आजार होत नाही.खेळामुळे शरीर तंदुरूस्त राहातेच.मग अशा ह्या तंदुरूस्त शरीरातले मनही घट्ट, समतोल आणि आनंदी का बरे राहाणार नाही?
खेळात कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. त्यामुळे आपल्या अंगी खिलाडूपणा येतो. एक प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण होते. संघभावना वाढीस लागते. पुढे जगात वावरताना आपल्याला चारचौघांना घेऊन कसे चालायचे ते समजते त्यामुळेच खेळांचे महत्व फार आहे. सर्वांनाच लहानपणी खेळायला मिळाले पाहिजे. प्रत्येक बालकाचा तो हक्कच आहे.
विद्यार्थी जीवनात अभ्यासाइतकेच खेळालाही महत्त्व आहे. पालकांच्या आता हे लक्षात आले आहे की, मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. मानवाचे संपूर्ण जीवन मन आणि शरीररूपी गाडीच्या दोन चाकांवर चालते. शिक्षण, चिंतन, मनन, व्यक्तीचा मानसिक विकास आणि व्यायाम, खेळ, शारीरिक विकास करतात.
खेळाची दोन रूपे असतात. घरात बसून खेळले जाणारे खेळ उदा. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते इ. मैदानावर मोकळ्या जागी खेळले जाणारे खेळ उदा. खो खो, क्रिकेट, फुटबॉल इ. घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे व्यायाम कमी पण बौद्धिक विकास आणि मनोरंजन होते. मैदानी खेळांमुळे शरीराला भरपूर व्यायाम होतो व मनोरंजनही होते.
‘निरोगी शरीरात निरोगी मनाचा निवास असतो शरीर अस्वथ असेल तर मनही अस्वस्थ असते. जी मुले केवळ पुस्तकातील किडे असतात त्यांचा शारीरिक विकास खुंटतो. ती चिडचिडी व सुस्त होतात. स्वत:चे रक्षणही ती करू शकत नाहीत. जी मुले अभ्यासाबरोबरच निरनिराळे खेळही खेळतात ती प्रसन्न व निरोगी राहतात.
उत्साही आणि चपळ राहिल्यामुळे शारीरिक शक्तीचा विकास होतो. यावरच मानसिक व आत्मिक विकास अवलंबून असतो. दिवसभर यत्राप्रमाणे काम केल्यानंतर जर खेळाच्या मैदानावर मुले गेली नाहीत तर बुद्धिमान विद्यार्थीसुद्धा निर्बुद्ध होऊन जाईल. आणखी काम करण्याची इच्छा मनात निर्माण होण्यासाठी खेळणे आवश्यक आहे.
विद्यार्थी, जीवनात फक्त अभ्यासच करीत राहू नये किंवा नुसते खेळतच बसू तथे तर “Work while you work, play while you play.” हे चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षण आहे. माणसाचे मन सदैव अभ्यासात गुंतलोले राहिल्यास डोके जड़ पडते आणि त्याला विश्रांतीची गरज भासते. ही विश्रांती खेळण्यामुळेच मिळते. खेळण्यामुळे मानसिक द्वंद्व मिटते. मन हलके होऊन शरीरात नवीन ऊर्जा शक्ती येते. हाडे मजबूत होतात आणि चेहरा कातिमान होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळ्यांची ज्योती (तेज) वाढते. शरीर वज्राप्रमाणे होते. खेन जीवनात संजीवनी बुटीचे काम करते. खेळ मनोरंजनाचे एक चांगले साधन आहे. जेव्हा खेळाडू खेळाच्या मैदानावर खेळतो तेव्हा तो पुलकित होतो. खेळ खेळण्यामुळे खेळाडू, स्वतः प्रेक्षकही आनंदी होतात.
क्रिकेट आणि हॉकीचा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित असतात. खेळाडूची एकाग्रता खेज व अन्य कामांत सारखीच असारे शिक्षण घेऊन जे शिकावयास मिळत नाही ते खेळात शिकावयास मिळते. उदा. शिस्त विद्यार्थी जीवनात शिस्तीला खूप महत्त्व आहे. शिस्तीत राहूनच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकता शिक्षकही शिस्तीतच अध्यापन करतात. शिस्त नसेल तर शाळा कुस्तीचे मैदान बनेल, जो संघ जितका शिस्तबद्ध असेल तितके सामना जिंकणे त्याला सोपे होते. अन्यथा हरणयाचा शक्यता जास्त असते. याखेरीज खेळात परस्पर सहकार्याची भावना पण उत्पन्न होत क्रिकेट, फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघाचे खेळ बगल असतात व प्रत्येकाचे महत्त्वही वेगळे असते. कप्तान संघनेता असतो. त्याच्या आदेशाच सगळे खेळाडू पालन करतात. संघातील खेळाडूंच्या परस्पर सहकार्यामुळे संघ विजयी हातो.
खळ मनुष्याला स्वावलंबी व आत्मविश्वासू बनवितो. ज्याप्रमाणे विद्यार्थी जीवनाचे उद्दिष्ट अभ्यास करणे हे असते त्याचप्रमाणे खेळाच्या मैदानावर उतरल्यावर खेळाडूचे टद्दिष्ट आत्मविश्वासाने खेळून विजय प्राप्त करणे हे असते. विजयाची इच्छा खेळाडूला विजयी बनविते. खळ हा खेळाडूचा आत्मा असतो. खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळले जावेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. खेळात संघर्ष हा असतोच. त्यातून जो विजय मिळतो त्याचा आनंद खास असतो. विजय मिळाल्यावर उत्साह वाटणे, पराजय सहन करणे व बदल्याची भावना मनात न ठेवता पराजयाच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करून जिंकण्याचा प्रयत्न करणे ही खऱ्या खेळाडूची लक्षणे हात. पराजयच यशाचा संदेश देते.
खेळांमध्ये केवळ दोन संघांमध्येच जवळीक निर्माण होते, असे नसून क्रिकेटसारख्या खेळांमुळे दोन देशांमध्ये ही जवळीक निर्माण होते. खेळ क्विबंधुत्वाची भावना निर्माण करतात. धनुर्विद्या, घोडेस्वारी, कबड्डी, मल्लयुद्ध यासारख्या खेळांची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आजही या खेळांचे महत्त्व कमी झालेले नाही.
भारत खेळांमध्ये मागे नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने येथे नेहमीच होतात. जिल्हा, मंडळ, प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धा होत राहतात. विजयी खेळाडूंना पुरस्कार दिले जातात. नव्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. खेळामध्ये नव्या गोष्टी शिकावयास मिळतात. आपल्या पराजयाची कारणे शोधून ती दूर करून पुन्हा विजय प्राप्त केला जातो. यात गुरू वा प्रशिक्षकाचे सहकार्य मिळते म्हणून भारत सरकार विजयी खेळाडूला “अर्जुन पुरस्कार” देते आणि प्रशिक्षकाला ‘द्रोणाचार्य पुरस्कार” देते.
शिक्षण मनुष्याला सभ्य आणि देशप्रेमी बनविते. खेळांमुळे बंधुत्व, सहकार्य, शिस्त, निष्ठा, स्वावलंबीपणा इत्यादी गुण विकसित होतात. म्हणून जीवनात खेळांचे स्थान गौण नाही.
- खेळ आणि खिलाडूपणा मराठी निबंध
- कालचे खेळ व आजचे खेळ मराठी निबंध
- क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे मराठी निबंध
- केल्याने देशाटन मराठी निबंध
- कुलपाचे आत्मवृत्त मराठी निबंध
- काश्मीरचे मनोगत निबंध मराठी
- कार्टून मराठी निबंध
- कागदाचे आत्मवृत्त मराठी निबंध
- कागदाची गोष्ट मराठी निबंध
- कागदाची कहाणी मराठी निबंध
- काखेत कळसा गावाला वळसा मराठी निबंध
- कष्टेविण फळ नाही | यत्न तो देव जाणावा | मराठी निबंध
- कटू कधी बोलू नये मराठी निबंध
- ऐतिहासिक वास्तूंच्या सहवासात मराठी निबंध
- एकीचे बळ निबंध मराठी
Leave a Reply Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Jivanatil KhelaChe mahatva essay in Marathi language | जीवनातील खेळाचे महत्व मराठी निबंध
Jivanatil KhelaChe mahatva essay in Marathi language – लहानपणी आपला बराचसा वेळ हा खेळण्यात जातो. पण लहानपणचे बहुतेक खेळ हे गमतीखातर खेळले जातात. त्यांत कोणतीही शिस्त नसते. बालपण हे फुलपाखरासारखे असते. जेव्हा बालपण संपते, शैशवही ओलांडले जाते आणि कुमारावस्था प्राप्त होते, तेव्हा शिस्तीची आवश्यकता निर्माण होते. जीवनातील सर्वच क्षेत्रांत शिस्त अनिवार्य आहे, तशी ती खेळांतही आवश्यक असते. बरेच प्रकारचे खेळ आहेत जे प्रामुख्याने इनडोअर आणि मैदानी अशा दोन प्रकारात विभागल्या जातात. ताश, लुडो, केरम साप इत्यादी खेळ मनोरंजनबरोबरच बौद्धिक विकासास मदत करतात, तर क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल इत्यादी मैदानी खेळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. या दोन वर्गांमधील फरक इतकाच आहे.
मैदानी खेळांसाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते, हा खेळ आपल्या शरीराची तंदुरुस्ती आणि आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहे, तर घरातील खेळांना अशा मोठ्या मैदानाची आवश्यकता नसते, हे घर अंगणात आहे. देखील खेळला जाऊ शकतो. या खेळांमध्ये, सर्व पिढ्यांमधील लोक, मग ती मुले, तरुण आणि ती मध्यम पिढी असो, सर्वांचे स्वतःचे स्वारस्य आहे. खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते. पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा सांधिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते ब मनाला उत्साह मिळतो. दोन-चार तास अभ्यास केल्यावर कंटाळा येतो. त्यानंतर थोडा वेळ खेळल्यावर कंटाळा पळन जातो आणि अभ्यासासाठी पुन्हा उत्साह येतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते, चापल्य येते.
आजच्या काळात मुलांचे खेळ घडलेले आहे. टीव्हीवर व्हिडिओ गेम, कॉम्पुटर वरती ऑनलाइन गेम कार रेस, पब्जी खेळ मुले तिथे बसून खेळतात. या प्रकारच्या खेळात त्यांना कुणाची सोबत लागत नाही. त्यामुळे एकलकोंडेपणा वाढतो. इतर मुलांशी मैत्रीचे संबंध निर्माण होत नाही. व्यायामही होत नाही; म्हणून शारीरिक वाढ आणि आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढतात. बुद्धी चपळता अशा खेळांमधून वाढत असलेली, तरी शारीरिक हानी मात्र होत आहे. त्यामुळे मैदानी खेळ आणि बैठे खेळ यांचा समन्वय साधून नवीन पिढीने आपले आरोग्य सांभाळले पाहिजे.
आपल्याकडे एकंदरीतच खेळाला खूप कमी महत्त्व दिले जाते. खेळात वेळ घालवणे म्हणजे फुकट वेळ घालू नये असे म्हणतात. वही दृष्टी चुकीची आहे. अन्न वस्त्र निवारा यायची खेळ माणसाची मूलभूत गरज आहे. कारण खेळामुळे शरीर व मन प्रसन्न होते. अशा खेळामुळे आरोग्य सुधारते. काम करण्यास वाव मिळतो. आवश्यक ती हालचाल झाल्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते. चैतन्य प्राप्त होते योग्य भूक लागते अत्यावश्यक ती झोप येते आणि कोणत्याही संघर्षाला तोंड देण्याचा आत्मविश्वास प्राप्त होतो. अशा निरोगी माणसात प्रतिकारशक्ती वाढते. म्हणून खेळ आरोग्यासाठी आवश्यक असतात.
मुलांना गार्डन मध्ये सकाळी चालणे व उडया मारणे, धावणे योग साधना करणे इत्यादी आरोग्यदायी क्रिडा प्रकार करवून घेता येतात. उंच व लांब उडया मारणे हा खेळ मुलांना फार आवडतो यामुळे त्याचे शरीर स्वस्थ राहाते व शरीराची चांगली कसरत होते. सायकल चालविणे हा एक चांगला क्रिडाप्रकार आहे. मुलांमध्ये सायकल चालविण्याची विलक्षण आवड असते त्यांना सायकल चालविणे फार आवडते त्यांना योग्य मार्गदर्शन देवून सायकल चालविणे शिकवू शकतो. सायकल चालविण्यामुळे संपूर्ण शरीराची कसरत होते. निर्णय क्षमतेचा विकास होतो. मुलांसोबत राहिल्यास त्यांच्या अंगात समाजाशी एकरूप होण्याची क्षमता विकसीत होते.
लपाछपी, लंगडी, हात लावणी, नदी पर्वत, उतरण उडी, नेमबाजी, बॅडमिंटन, हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हे काही पारंपारीक व काही व्यावसायिक खेळ मुलांमध्ये खेळवल्यास त्यांच्या कौशल्याचा विकास होतो. त्यांच्यात समाजाशी एकरूप होण्याची भावना, सहकार्याची, नेतृत्व गुणाची भावना वाढते. त्यामुळे मुलांचा विकास चांगला होतो. तसेच योग्य कौशल्य जोपासल्यास मुले व्यावसायिक दृष्टया खेळाकडे बघू शकतात.
जीवनात खेळाचे महत्त्व एकदा मान्य झाले की, आवश्यक मदतीचा ओघ वाहू लागेल. यासाठी सरकारवर संपूर्ण अवलंबून राहणे योग्य व पुरेसे होणार नाही. यासाठी काही धनिक व्यक्ती आणि संस्थानिकांनी पुढे यायला हवे. दुसरे एक महत्त्वाचे पथ्य पाळले पाहिजे, हे म्हणजे खेळात राजकारण नको. खेळा खेळत राहिला पाहिजे. गेल्या काही वर्षात आपल्याकडे क्रिकेटला अवास्तव महत्त्व आले आहे. पण क्रिकेट सामान्यत आलेली धंदेवाईक वृत्ती ही खेळाडूच्या निष्ठेचा आणि आनंदाचा नाश करते.
अगदी स्पर्धकांचा विचार काही काळ दूर ठेवला, तरी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मापक वेळ हवा. जपानमध्ये ठराविक वेळी सर्वांना अगदी मुख्य अधिकार्यांपासून झाडूवाल्या पर्यंत बयान करावाच लागतो. योगासने हा आपल्या देशाचा प्राचीन वारसा आहे. योगसाधना केल्यामुळे दीर्घायुष्य निरामय ठरेल. खेळामुळे अपयशाला तोंड देण्याचे साहस येते, सांघिक वृत्ती वाढते व खेळाडू तिचा विकास होतो आणि जीवन आनंदमय होते.
खेळांचाही अभ्यास करावा लागतो, खेळालाही सराव लागतो आणि खेळासाठीही उत्तम मार्गदर्शक गुरू असावा लागतो. खेळ म्हटला की यश आणि अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार, पण हारही हसत स्वीकारता आली पाहिजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातून येणारी ही खिलाडूवृत्ती जीवनात फार उपयोगी पडते. प्रत्येकाला आपल्या जीवनात केव्हा ना केव्हा संकटाला तोंड द्यावे लागते. कधी हार पत्करावी लागते. अशा वेळी खिलाडूवृत्ती असेल तरच आपण पुढे जातो. अपयशाने खचून जाणाऱ्याच्या हातून काहीचं घडत नाही. जशी हार, तशीच जीत ! हार झाल्याने खचून जाऊ नका. तसेच, जीत झाल्याने फुगून जाऊ नका, असे सच्चा खेळाडू सांगतो. खेळातील जय ज्याप्रमाणे संयमाने स्वीकारावा, तसाच जीवनातील विजयही विनगम्रतेने स्वीकारावा.
प्राचीन काळापासून, क्रीडा हा जिवंत जीवनाचा आधार मानला जात आहे, ज्यामुळे आपले शरीर विकसित होते, तसेच ते आपले जीवन देखील यशस्वी करते. भारतातील नामांकित खेळाडूंना सरकार अनेक पुरस्कारांनी सन्मान करते, अर्जुन आणि द्रोणाचरसारखे पुरस्कार या वर्गात येतात. महिलांनीही या दिशेने गौरव केले आहे, पीटी उषा, मेरी कोम, सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा या महिला खेळाडूंनी विविध प्रकारच्या खेळांमध्ये यश संपादन केले आहे. त्यापैकी पीटी उषा धावपळीत, बॉक्सिंगमध्ये मेरी कॉम, बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि टेनिसमधील सानिया मिर्झा यांनी देशाला अभिमानाने गौरविले आहे. खेलो हे भारतीय संस्कृती आणि ऐक्याचे प्रतिक असल्याचेही म्हटले जाते, यात कोणत्याही जातीभाषा आणि धर्माचा विरोध नाही, परंतु कोणत्याही धर्माची कोणतीही व्यक्ती ही भूमिका बजावू शकते. अशा प्रकारे खेळ आपल्या मार्गाची प्रगती सुनिश्चित करुन यशस्वी आयुष्य घडविण्यात मदत करतो. खेळाच्या संदर्भात आपल्या देशाने आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले, मग ते कुस्ती, बॉक्सिंग, बॅडमिंटन असो, शूटिंगने स्वत: च्या कौशल्याने सर्वच प्रकारात प्रसिद्धी मिळविली.
सुशील कुमार जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी पहिली कुस्तीपटू आहे. महिला बॉक्सर मेरी कॉम एक प्रसिद्ध बॉक्सर आहे, ज्याने मणिपूर राज्यातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. तिला राजीव गांधी यांनी पद्मश्री अर्जुन पुरस्कार सारख्या विविध रत्नांनी गौरविले आहे. भारत सरकारकडून खेल. पुरस्काराने सन्मानित. दर चार वर्षांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताला यश मिळाले आहे. कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्ससारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर खेळांमध्येही भारतीय खेळाडूंनी आपले नाव जागतिक स्तरावर आणले आहे.
म्हणून मित्रांनो नियमित खेळा व आनंदी राहा. आपल्या जीवनात खेळाचे खूप महत्त्व आहे, हे जाणून घ्या. तुम्हाला Khelache Mahatva essay in Marathi language हा निबंध कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
जीवनात खेळाचे महत्व मराठी निबंध | jivanat Khelache mahatva in marathi
खेळ असावा निखळ.
jivanat Khelache mahatva in marathi : खेळ म्हणजे क्रीडा. करमणुकीचे साधन. ज्याच्यामुळे आपल्याला विरंगुळा मिळतो, आनंद मिळतो ती क्रीडा. आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात, दु:ख, चिंता, विवंचना या सगळ्यांतून काही क्षण तरी सुख, आनंद मिळवता यावे यासाठी आपण खेळतो. रोजचे काम प्रत्येकाला करावेच लागते. तेच तेच काम करून कंटाळा येतो. त्यातून थोडासा बदल घडवून करमणूक व्हावी यासाठी आपण एखादा नाटकाचा प्रयोग देखील बघतो. एखादा चित्रपटही बघतो. या करमणुकीच्या प्रयोगांना देखील खेळच म्हणतात. म्हणजेच बघा, आपण आपल्या मनावरील दडपड कमी करण्यासाठी खेळ खेळतो किंवा बघतो. आपलं जीवन हा देखील एक खेळच आहे. हो अगदी दोन घडीचा डाव.
दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. हासत हासत झेलू आपण पराजयाचे घाव.
खेळ म्हटला की, जय, पराजय, यश, अपयश हे आलंच. जीवनाचा खेळ म्हणजे यश-अपयश यांचा लपंडावच. मग यशानं हुरळून जाऊ नका आणि पराजयाने खचून जाऊ नका. असा मोलाचा संदेश या खेळामागून येतोच. मग हे जर सत्य आहे तर खेळ निखळ म्हणजे शुद्ध का असू नये? खेळ निर्भेळ आनंदासाठी खेळला जातो. मग त्यातून दुःख, पश्चात्ताप का निर्माण होतो, याचाही कुठेतरी विचार केला जातो.
खेळ अगदी प्राचीन काळापासून खेळला जाऊ लागला. त्यावेळी तो खेळकरपणे खेळला जाऊ लागला. गंमत वाटावी, विरंगुळा मिळावा म्हणून. ग्रीस देशात प्रथम ऑलिंपिक खेळाची संकल्पना रुजली. १८९६ मध्ये स्पर्धेसाठी निधी उभारला. पोस्टाचे तिकिट प्रसिद्ध करून त्यातून जगभर ऑलिंपिकचा संदेश पोहोचवला. एकेमकांत गुंफलेली पाच वर्तुळे म्हणजे एकात्मतेचे प्रतीक हेच या स्पर्धेसाठी बोधचिन्ह मानले गेले. हेच चिन्ह ध्वजावर कोरले गेले. ‘सायटस, अल्टीअस आणि फॉर्टिअस’ हे तीन शब्द त्याचे बोधवाक्य होते. याचाच अर्थ अधिक गतिमान, अधिक उंच आणि अधिक सामर्थ्यवान. या सर्व गोष्टींवरून खेळामागील उद्देश निखळ होता हेच सिद्ध होते.
जीवनात यशस्वी होणे यापेक्षाही त्यासाठी झगडणे ही जशी महत्त्वाची बाब आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्यावर विजय मिळविणे यापेक्षा स्पर्धेत भाग घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
आपणच जिंकलं पाहिजे या ईर्षेपायी खेळामागील मूळ कल्पनेला धक्का लागेल अशी काही कृत्ये नेहमीच घडत असतात. ध्वजच पळवून नेणे, मैदानातून खेळाडूंना पळवून नेणे, स्वतःच जिंकण्यासाठी उत्तेजक पेय घेणे, पंचांनी चुकीचा निर्णय देणे, मैदानातील गैरवर्तन, प्रसिद्धीची हाव, पैसा मिळवणं या सर्व गोष्टी पाहिल्या की, वाटतं खेळ निखळ आहे का?
महाभारतातील उदाहरण बघा, कौरव-पांडव द्युत खेळले. त्यातही कारस्थान होतंच. निखळता नव्हती. प्रसंगी द्रौपदीला पणाला लावलं गेलं. हा खेळाचा हेतू असू शकतो का? खेळातील निखळता कृष्णाच्या सवंगड्यांच्या खेळाप्रमाणे असायला हवी. बाल शिवाजी जशी आपल्या सवंगड्यांसमवेत लुटुपुटूची लढाई खेळत होता तशी हवी. खेळातला रडीचा, चिडीचा डाव तिथल्या तिथं संपतो. त्यातही एक मोठी मौज असते. पण आजकाल खेळाला महत्त्व प्राप्त झालं. पैसा, प्रसिद्धी मिळू लागली. त्याबरोबर त्यात राजकारण शिरलं. स्पर्धा शिरली. जीवघेणी चढाओढ सुरू झाली. चढाओढ म्हणजे काय चढणाऱ्याला ओढणं.
jivanat Khelache mahatva in marathi (600 words)
खेळ म्हटलं की स्पर्धा आली. पण त्याआधी प्रत्येकाचा वैयक्तिक खेळ महत्त्वाचा. त्यातून संघ तयार होतो. मग वैयक्तिक गुण, दोष तेच संघाच्या रूपाने जगापुढे येतात. मग त्यातून खेळातील आनंद निघून जातो. चांगल्या खेळाडूंवर अन्याय होतो.
याची काही उदाहरणे बघितली म्हणजे लक्षात येईल की, मी हे जे काही म्हणतोय ते किती खरं आहे, सार्थ आहे. आता बघा, बऱ्याच खेळांसाठीचे संघ निवडताना कोटा पद्धत वापरली जाते. त्यामध्ये असोसिएशनमधील राज्यांचे प्रतिनिधी असतात त्या राज्यातील जास्तीत जास्त खेळाडू संघामध्ये असतात. इतर राज्यातले चांगले खेळाडू मात्र बाहेर बसवले जाऊन त्यांच्यावर अन्याय घडतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठविला जाणे म्हणजे संघर्षाची नांदीच असते. संघर्ष हा काही आनंददायी नसतो.
आता धनराज पिल्लेचंच उदाहरण घ्या ना. त्याला आपला न्याय्य हक्क मिळविण्यासाठी झगडावंच लागलं. नुकतंच आपण ऐकलं की, ऑस्ट्रेलियन खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूवर खेळ चालू असताना टीका करतात, वाकुल्या दाखवतात. चक्क रन काढताना आडवे येऊन त्रास देतात. जावेद मियांदाद व डेनिस लीलीची मैदानात लाथेनं झालेली मारामारी जगानं पाहिली, तर पंचांनी चुकीचा निर्णय दिला म्हणून सामना सोडून कप्तान संतप्त होऊन निघून जायला लागलेलं आपण पाहिलं आहे. जॉन मॅकेनरोला मैदानात गैरवर्तन केलं म्हणून हजारो रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या सर्वांवरून लक्षात येईल की, खेळातला सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे खेळाडू. म्हणजेच त्याची गुणवत्ता, त्याचे चारित्र्य निखळ असेल तरच खेळ निखळ होईल. पण आज दुर्देवानं त्याची वाण आहे, त्यामुळेच आज खेळ निखळ राहिलेला नाही..
- सुपर कॉम्प्युटर म्हणजे काय
खेळाडू असे का वागतात हा प्रश्न मला नेहमी पडतो. मी त्या प्रश्नावर विचार करतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की, खेळाचा हेतू, त्यामागील भूमिकाच त्यांनी समजून घेतलेली नसते. “माणसाचे वर्तन हेच त्याच्यावरील संस्कारांचं प्रतिबिंब असतं.” म्हणूनच खेळाडू म्हणजेच माणूस प्रथम सुसंस्कारित हवा. म्हणजे खेळही सुसंस्कृतपणे खेळला जाईल. आडात असेल तरच पोहऱ्यात येणार ना?
मनुष्य आचार, विचार, उच्चार या तिन्ही बाबतींत सुसंस्कृत हवा. त्यात प्रदूषण डोकावलं की सगळा खेळच खलास. मला वाटतं हा सुसंस्कृतपणा माणसापाशी असलाच पाहिजे. नाहीतर पशूत नि आपल्यात फरक काय? निखळ खेळ असावा यावर आपण उपाय शोधलाच पाहिजे. वैयक्तिक पातळीवर खेळता येणारे खेळ खेळावेत. दोरीवरच्या उड्या, लांब उडी, उंच उडी, जॉगिंग, सूर्यनमस्कार, जोर, बैठका, योगासने, जलद चालणे, चेंडूचे टप्पे, मल्लखांब इ. यामुळे शरीर सुदृढ होण्यास मदत होईलच आणि शरीराचा सुदृढ वापर कशासाठी करायचा हेही समजलं तर खेळातील निखळता टिकेल.
‘शरीर माध्यमं खलु धर्म साधनम्’ असं म्हटलं गेलं आहे. धर्म म्हणजे इथं मानवता धर्म असा अर्थ घेतला तर मानवताधर्म साध्य करण्यासाठी शरीराचा साधन म्हणून वापर करावा. असं मला वाटतं. भारतीय संस्कृतीनं धृ धारयते इति धर्मः। अशी धर्माची व्याख्या केली आहे. पाश्चात्त्य संस्कृती सांगते Health is Wealth म्हणजेच शरीर ही संपत्ती आहे. मला मात्र शरीर धर्मकारणासाठी वापरणाऱ्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटतो. या संस्कृतीने दिलेल्या मार्गावरून चालणारा भारतीय क्रिकेटपटू विजय मर्चंट यांची मला या प्रसंगी आठवण होते. याचे कारण म्हणजे हा खेळाडू खेळ सुसंस्कृतपणे खेळला. खेळातून निवृत्ती घेतल्यावर आयुष्याची दुसरी इनिंग त्यांनी अंधांसाठी काम करून सार्थकी लावली. बघा खेळाडूतील माणूस सुसंस्कृत असेल तर जगण्याबद्दलची धारणा परहिताय बनू शकते.
5G Network (5G नेटवर्क) म्हणजे काय आहे
अशाच एका सुसंस्कृत माणसाने निखळपणे खेळलेल्या खेळाचं उदाहरण मी तुम्हांला सांगतो. भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यात गुंडाप्पा विश्वनाथ कॅप्टन होते. सामना रंगात आला असताना पंचांनी एका खेळाडूला बाद दिलं. निर्णय चुकीचा होता, हे कर्णधार म्हणून गुंडाप्पा विश्वनाथने पंचांना त्या खेळाडूला खेळू द्यावं अशी विनंती केली. ती विनंती पंचांनी मान्य केली. थोडक्यात पंचांनी पण आपली चूक स्वीकारली आणि त्या खेळाडूला खेळण्याची परवानगी दिली. तो फलंदाज पॅव्हेलियनमध्ये न जाता खेळू लागला. मजा काय झाली पाहा, सामना फिरला आणि भारताचा पराभव झाला. पण माझ्या मते हा खेळ स्कोअर बुकच्या पलीकडे नोंदवला गेला. कारण या सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवापेक्षा कर्णधार विश्वनाथ निखळ खेळाडू म्हणून नोंदवला गेलेला विजय जास्त महत्त्वाचा.
माणूस म्हणून तुम्ही निखळ असाल तरच खेळ निखळ होतो. नम्रता, शिस्तपालन, माणुसकी हे खेळातील यशापेक्षा मोठं असतं. स्वतःबरोबर इतरही माणसे आहेत याचं भान राखता आले पाहिजे. निखळता म्हणजेच शुद्धता. शुद्धतेचं उत्तम उदाहरण म्हणजे सोन्याचं. सोन्याची शुद्धता तपासून पाहताना त्याला अग्निदिव्यातून जावं लागतं. तेच खेळाच्याही बाबतीत आहे. खेळ खेळणारा खेळाडू माणूसच असतो. मग त्याने आपले व्यक्तिमत्त्व तावून सुलाखून घेतले पाहिजे. खेळ वैयक्तिक पातळीवर होतो तसा तो दोन व्यक्तींत होतो, दोन संघांत होतो, दोन देशांत होतो. या सर्व पातळीवर होतो तो मानवी व्यवहार, व्यवहार म्हटला की, त्यात सचोटी हवी, नैतिकता हवी. ही मूल्ये चिरंतन टिकणारी आहेत. विजय मिळवायचा असतो निखळ आनंदासाठी. मग त्याचं अध:पतन होता कामा नये. खेळाला नियम आहेत. धर्म आहे. म्हणजेच खेळासाठी ठरवलेले नियम पाळणे हाच खेळाडूचा धर्म. हा धर्म पाळायचा आहे मग नियमातून पळवाटा काढायच्या कशाला? वाद कशाला? फसवून, भांडून मिळवणारा विजय निखळ असेलच कसा? ‘डाव मांडून, भांडून मोडू नको.’ या गीताची आठवण येते.
खेळ आनंदासाठी आहे, त्यासाठी असलेल्या स्पर्धा निमित्त आहेत. मग भारत-पाक सामन्यांच्यावेळी पारंपरिक शत्रू असे विधान ठीक नाही. युद्धातील शत्रू खेळात असू नये. शत्रुत्वाच्या भावनेने खेळ खेळला तर तो खेळच होणार नाही. खेळ असतो आनंदासाठी, पण युद्ध मात्र आनंदासाठी नसते. “खेळ प्राणपणाला लावून खेळला जात नाही, तर कौशल्य पणाला लावून जातो.” म्हणून उत्तमोत्तम कौशल्यात स्पर्धा व्हावी. जीत क्षणिक असते. स्पर्धा खेळला संपल्यावर स्पर्धक परस्परांचे मित्रच राहतात. असं झालं तर खेळ होईल ना निखळ? तेव्हा उत्स्फूर्त आविष्कार हा खेळाचा अविभाज्य भाग बनवा, त्यात इर्षा नको, म्हणूनच म्हणतो, “खेळ असावा निखळ.”
- प्रदूषण मराठी निबंध
- माझा आवडता सण
- 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Importance of sports In Marathi | Khelache Mahatav Marathi Nibandh | खेळाचे महत्व मराठी निबंध
खेळाचे महत्व मराठी निबंध.
खेळ हा नेहमीच मानवी संस्कृतीचा आणि समाजाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. सभ्यतेच्या सुरुवातीच्या काळापासून, लोक मनोरंजन आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी विविध प्रकारचे खेळ आणि खेळांमध्ये गुंतलेले आहेत. वर्षानुवर्षे, खेळ मोठ्या उद्योगात विकसित झाले आहेत, अब्जावधी चाहत्यांना आकर्षित करत आहेत आणि लक्षणीय कमाई करत आहेत. तथापि, व्यावसायिक पैलूंच्या पलीकडे, खेळाचे मानवी जीवनात खूप महत्त्व आहे, जे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक कल्याणासाठी योगदान देते. या निबंधात, आम्ही खेळांच्या महत्त्वाची तपशीलवार चर्चा करू आणि खेळ वैयक्तिक आणि सामूहिक वाढ आणि विकासासाठी कसे योगदान देतात ते शोधू.
शारीरिक तंदुरुस्ती:
शारीरिक तंदुरुस्ती हा खेळाचा सर्वात महत्वाचा फायदा आहे. क्रीडा क्रियाकलापांमध्ये गुंतल्याने शारीरिक तंदुरुस्ती आणि एकंदर आरोग्य राखण्यास मदत होते. खेळांमध्ये शारीरिक श्रमाचा समावेश असतो, ज्यामुळे स्नायू, हाडे आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली मजबूत होते, ज्यामुळे लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह आणि इतर रोगांचा धोका कमी होतो. खेळ खेळल्याने तग धरण्याची क्षमता, लवचिकता आणि चपळता देखील सुधारते, जे सक्रिय जीवनशैलीसाठी आवश्यक आहेत. शिवाय, खेळ निरोगी शरीराची प्रतिमा तयार करण्यास, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान सुधारण्यास मदत करतात.
मानसिक आरोग्य:
शारिरीक तंदुरुस्ती सोबतच खेळामुळे मानसिक आरोग्यालाही हातभार लागतो. खेळ खेळल्याने तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. नियमित शारीरिक क्रियाकलाप एंडोर्फिनचे उत्पादन उत्तेजित करते, जे नैसर्गिक मूड वाढवणारे आहेत. हे मानसिक कल्याण सुधारते, तणाव कमी करते आणि जीवनाची गुणवत्ता वाढवते. खेळामुळे संज्ञानात्मक विकास, एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता यासारख्या मानसिक क्षमता सुधारण्यातही हातभार लागतो. शिवाय, क्रीडा नेतृत्व कौशल्ये, सांघिक भावना आणि संवाद कौशल्ये विकसित करण्यात मदत करतात, जे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक आहेत.
सामाजिक विकास:
सामाजिक विकासासाठीही खेळ महत्त्वाचे आहेत. क्रीडा क्रियाकलापांमध्ये भाग घेतल्याने सांघिक कार्य, संवाद आणि सहकार्य यासारखी सामाजिक कौशल्ये विकसित करण्यात मदत होते. खेळ विविध पार्श्वभूमी आणि संस्कृतीतील लोकांशी संवाद साधण्याची संधी देतात, ज्यामुळे विविधता आणि समजूतदारपणा वाढतो. खेळ देखील सामाजिक एकात्मतेसाठी एक व्यासपीठ प्रदान करतात, लोकांना एकत्र आणतात आणि समुदायाची भावना वाढवतात. शिवाय, खेळ आपुलकीची आणि ओळखीची भावना विकसित करण्यास मदत करतात, जे वैयक्तिक आणि सामूहिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
चारित्र्य बांधणी:
शिस्त, चिकाटी आणि खिलाडूवृत्ती यांसारख्या मूल्यांना प्रोत्साहन देऊन चारित्र्यनिर्मितीमध्ये खेळ योगदान देतात. खेळ खेळण्यासाठी शिस्त, वचनबद्धता आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत, जे मजबूत कार्य नैतिकता विकसित करण्यास मदत करते. खेळ देखील चिकाटी शिकवतात, कारण खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी आव्हाने आणि अडचणींवर मात करणे आवश्यक असते. शिवाय, खेळ खेळामुळे खेळाला प्रोत्साहन देतात, ज्यात निष्पक्ष खेळ, प्रतिस्पर्ध्यांचा आदर आणि विजय-पराजय कृपापूर्वक स्वीकारणे यांचा समावेश होतो. ही मूल्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ आणि विकासासाठी आवश्यक आहेत.
आर्थिक प्रगती:
खेळामुळे रोजगार आणि महसूल निर्माण करून आर्थिक विकासातही हातभार लागतो. खेळांमुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी तसेच क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात गुंतलेल्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. खेळ देखील तिकीट विक्री, प्रायोजकत्व, प्रसारण हक्क आणि व्यापारी वस्तूंच्या विक्रीद्वारे कमाई करतात. या महसुलाचा उपयोग क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, प्रशिक्षण सुविधा आणि तळागाळातील खेळांच्या प्रचारासाठी केला जाऊ शकतो. शिवाय, क्रीडा पर्यटन पर्यटकांना क्रीडा स्पर्धांकडे आकर्षित करून आर्थिक विकासास हातभार लावते, ज्यामुळे अतिरिक्त महसूल प्रवाह निर्माण होतो.
खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, जो शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक कल्याणासाठी योगदान देतो. खेळ शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य, सामाजिक विकास, चारित्र्य निर्मिती आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देतात. म्हणूनच, तळागाळापासून व्यावसायिकांपर्यंत सर्व स्तरांवर खेळांना प्रोत्साहन देणे आणि क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सरकार, खाजगी संस्था आणि व्यक्तींनी क्रीडा पायाभूत सुविधा, प्रशिक्षण सुविधा आणि क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी गुंतवणूक केली पाहिजे. खेळांना प्रोत्साहन देऊन आपण निरोगी, आनंदी आणि अधिक समृद्ध समाज निर्माण करू शकतो.
शिवाय, खेळाचे फायदे केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचतात. खेळांमध्ये लोकांना एकत्र आणण्याची, सामाजिक एकात्मता वाढवण्याची आणि समुदायाची भावना वाढवण्याची शक्ती असते. क्रीडा इव्हेंट विविध पार्श्वभूमी आणि संस्कृतीतील लोकांना एकत्र येण्यासाठी, त्यांच्यातील फरक साजरे करण्यासाठी आणि त्यांच्या समानतेचे कौतुक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात. हे विविधता, सहिष्णुता आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन देते, जे सुसंवादी आणि शांततापूर्ण समाजासाठी महत्त्वपूर्ण आहेत. शिवाय, खेळ देशाच्या अस्मितेचे प्रतिनिधित्व करून आणि राष्ट्रीय अभिमान वाढवून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऐक्याला प्रोत्साहन देतात. ऑलिम्पिक खेळ, विश्वचषक आणि राष्ट्रकुल खेळ यासारख्या क्रीडा स्पर्धा विविध देशांतील लोकांना एकत्र आणतात, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देतात.
शिक्षणातही खेळाची भूमिका महत्त्वाची असते. शाळांमधील क्रीडा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि सामाजिक विकासाला चालना देतात. खेळ हे सांघिक कार्य, नेतृत्व आणि संप्रेषण यासारखी महत्त्वाची जीवन कौशल्ये देखील शिकवतात, जी व्यावसायिक जगात यश मिळवण्यासाठी आवश्यक असतात. शिवाय, शाळांमधील क्रीडा उपक्रम निरोगी स्पर्धेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देतात, जिथे विद्यार्थी विजय आणि पराभव स्वीकारण्यास आणि आव्हाने आणि अडथळ्यांबद्दल सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्यास शिकतात. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांना क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पुरेशा सुविधा आणि संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यांना खेळ हा करिअरचा पर्याय म्हणून जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
अलीकडच्या काळात, पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यासाठी खेळांच्या महत्त्वाकडेही लक्ष वेधले गेले आहे. क्रीडा संस्था आणि कार्यक्रम त्यांच्या कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलत आहेत. उदाहरणार्थ, टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, टिकाऊपणाला चालना देण्यासाठी आणि कचरा कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. असे उपक्रम केवळ पर्यावरणीय शाश्वततेला चालना देत नाहीत तर पर्यावरणपूरक पद्धतींच्या महत्त्वाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतात.
तथापि, खेळाचे असंख्य फायदे असूनही, आव्हाने देखील आहेत ज्यांना संबोधित करणे आवश्यक आहे. विशेषत: विकसनशील देशांमध्ये क्रीडा पायाभूत सुविधा आणि सुविधांचा अभाव हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. पुरेशा सुविधा आणि प्रशिक्षणाच्या संधींचा अभाव तरुण खेळाडूंच्या सहभागावर मर्यादा घालतो आणि त्यांच्या विकासात अडथळा आणतो. त्यामुळे सरकार आणि खाजगी संस्थांनी क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करावी, प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि तळागाळात क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. शिवाय, खेळांच्या व्यापारीकरणामुळे खेळाडूंचे शोषण आणि खेळाडू आणि क्रीडा संघटना यांच्यातील शक्तीच्या असंतुलनाबद्दलही चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे, खेळाडूंचे हक्क आणि हित जपले जातील आणि व्यावसायिक फायद्यासाठी त्यांचे शोषण होणार नाही याची खात्री करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.
शेवटी, खेळाचे मानवी जीवनात खूप महत्त्व आहे, शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक कल्याणासाठी योगदान देते. खेळ शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य, सामाजिक विकास, चारित्र्य निर्मिती आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देतात. खेळ देखील पर्यावरणीय शाश्वतता आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऐक्याला प्रोत्साहन देतात. त्यामुळे सर्व स्तरांवर खेळांना प्रोत्साहन देणे आणि क्रीडा पायाभूत सुविधा, प्रशिक्षण सुविधा, क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देणे यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. असे केल्याने आपण एक निरोगी, आनंदी आणि अधिक समृद्ध समाज निर्माण करू शकतो.
हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-
- My favorite sport is football | Maza Avadta Khel Football | माझा आवडता खेळ फुटबॉल
- Population Growth Essay | Population Information Nibandh | लोकसंख्या वाढ निबंध मराठी.
- My favorite animal is a Elephant | Maza Avadta Prani Hatti | माझा आवडता प्राणी हत्ती .
- My favorite animal is a Rabbit | Maza Avadta Prani sasaa | माझा आवडता प्राणी ससा .
- Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
- My favorite Sport is Kabaddi | Maza Avadta Khel Kabaddi | माझा आवडता खेळ कबड्डी
Marathi Essay
पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!
Sope Nibandh (सोपे निबंध)
Header ads widget, विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्व - vidyarthi jivanatil khelache mahatva - importance of sports in student life essay in marathi., विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्व | vidyarthi jivanatil khelache mahatva | importance of sports in student life essay in marathi |.
विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्व - Vidyarthi Jivanatil Khelache Mahatva - Importance of Sports In Student Life Essay In Marathi. |
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या.
Please do not enter any spam link into comment box.
This Blog is protected by DMCA.com
- Privacy Policy
- Terms & Conditions
हा ब्लॉग शोधा
- आत्मवृत्त
- कथालेखन
- कल्पनात्मक
- पत्रलेखन
- प्रश्नोत्तरे
- माहिती
- वर्णनात्मक
- वैचारीक
- व्याकरण
- संवाद लेखन
- सामाजिक
Popular Posts
संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.
कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.
पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.
Copyright (c) 2023 sopenibandh All Right Reseved
व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी Vyayamache Mahatva Essay in Marathi
Vyayamache Mahatva Essay in Marathi – Importance of Exercise in Marathi व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी मित्रांनो, आज मी तुम्हाला आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये व्यायामाचे काय महत्त्व आहे हे सांगणार आहे. आजकाल सर्व लोक दिवसभर आपल्या कोणत्या ना कोणत्या कामामध्ये खूप व्यस्त असतात. त्यांना त्यांच्या शरीराकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो. पण, हे अत्यंत चुकीचे आहे. आपण जेवढे आपल्या कामाला महत्त्व देतो, तेवढेच महत्त्व आपण आपल्या शरीराला देणे गरजेचे आहे. कारण, जर आपलं शरीरचं मजबूत नसेल तर आपण काम करू शकणार नाही आणि जर आपल्याला आपलं शरीर मजबूत करायचं असेल तर, न चुकता अगदी रोजच्या रोज म्हणजेच नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे.
व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी – Vyayamache Mahatva Essay in Marathi
व्यायाम म्हणजे नेमकं काय – exercise information in marathi.
शरीराला मजबूत करण्यासाठी, शरीरातील स्नायू बळकट करण्यासाठी आणि शरीराची ताकद वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेस व्यायाम असे म्हणतात. व्यायामामध्ये धावणे, पळणे, पोहणे, मैदानी खेळ खेळणे, जोर-बैठका मारणे, जड वजन उचलणे इत्यादी. अनेक गोष्टींचा समावेश होतो.
निरोगी जीवनासाठी व्यायामाचे महत्त्व – Importance of Exercise in Marathi
मित्रहो, आजच्या आधुनिक काळामध्ये हवा प्रदूषण खूप जास्त प्रमाणात वाढले आहे आणि या वाढत्या प्रदूषणामुळे लोक वारंवार आजारी पडत आहेत. कारण, विकासाच्या प्रक्रियेमध्ये माणूस खूप पुढे निघून गेला आहे. पण, स्वतःचे आरोग्य मात्र पूर्णपणे बिघडवून बसला आहे आणि म्हणूनच निरोगी जीवन जगण्यासाठी तसेच, कोणत्याही आजारापासून वाचण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यामुळे, सर्वांनी व्यायाम करणे ही काळाची गरज आहे. मित्रहो, समजा तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेत पण, तुमचे आरोग्य व्यवस्थित नाही तर, मग तुम्ही त्या सर्व गोष्टींपासून मिळणाऱ्या सुखांचा अनुभव आनंदाने किंवा व्यवस्थितपणे घेऊ शकाल का? तर अजिबात नाही घेऊ शकणार.
नियमित व्यायामामुळे शरीराला होणारे फायदे
- आत्मविश्वास वाढवते आणि कोणतेही कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते.
- व्यायामामुळे शरीर निरोगी राहते आणि कोणतेही आजार होत नाही.
- शरीरामध्ये बल वाढते आणि शरीरातील स्नायू बळकट होतात.
- नियमितपणे व्यायाम केल्यामुळे शरीराला लवचिकता प्राप्त होते.
- शरीराची पचन शक्ती वाढते आणि मजबूत होते.
- शरीरातील अनावश्यक चरबीचे प्रमाण कमी होते.
- व्यायामामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो.
- व्यायामामुळे आळस येत नाही.
- व्यायामामुळे मन नेहमी प्रसन्न राहते.
- नियमित व्यायामामुळे शरीरातील बल वाढते आणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वृद्धी होते.
- मानसिक तणाव कमी होतो.
- नियमित व्यायामामुळे झोप व्यवस्थित लागते.
- व्यायामामुळे शरीरातील धमक वाढते.
- हृदय आणि फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते.
- उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा असे आजार व्यायामामुळे होत नाहीत.
- व्यायामामुळे थकवा जाणवत नाही.
- शरीरातील हाडे मजबूत होतात.
- व्यायामामुळे शरीराला चांगला आकार प्राप्त होतो.
- नियमितपणे व्यायाम केल्यामुळे शरीर खूप छान दिसते.
बदलत्या आधुनिक जीवनशैलीत व्यायामाचे फायदे – Vyayamache Fayde
मित्रहो, अलीकडे विकासाच्या, धावपळीच्या आणि आधुनिक विज्ञानाच्या युगात सर्व प्रकारच्या वयोगटातील लोक हल्ली व्यायामाकडे खूप दुर्लक्ष करत आहेत. शिवाय, तरुण वर्गातील जास्तीत जास्त मुले अभ्यासाच्या ताणतणावामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष करत आहेत. वृद्ध वर्गातील लोकांना असे वाटते की, आता वय झाले आहे तर व्यायाम करण्याचा काय उपयोग, त्यामुळे ते व्यायाम करत नाहीत पण हे चुकीचे आहे.
कारण व्यायामासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही वयाचे असो तुम्ही व्यायाम करू शकता. वृद्ध लोकांनी जर व्यायाम केला तर त्यांना होणारे विविध प्रकारचे त्रास म्हणजे गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, वयोमानानुसार हाडे कमकुवत होणे, तसेच हालचाल करण्यात समस्या उद्भवणे आणि मधुमेह इत्यादी. कमी होऊ शकतात.
अलीकडील काळामध्ये सर्व लोक सुख, समृद्धी आणि पैसे कमवण्याच्या मागे लागले आहेत पण, या सगळ्यांत मात्र ते स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत आहेत. समजा आपल्या सर्वांकडे खूप पैसा आहे, ऐश्वर्य आहे, सर्व सुख-सुविधा आहेत पण जर चांगले आरोग्य नसेल तर या सर्व गोष्टींचा काय फायदा कारण, आपण ह्या सर्व गोष्टींमधील सुख अनुभवू शकणार नाही.
म्हणूनच मित्रहो, जर तुम्हाला सर्व प्रकारच्या सुखसुविधा अनुभवायच्या असतील तर तुम्हाला रोजच्या रोज आणि नियमितपणे व्यायाम करावा लागेल. कारण, व्यायाम केल्याने आपले तन आणि मन स्वस्थ, निरोगी आणि प्रसन्न राहते.
व्यायामाचे फायदे – Benefits of Exercise in Marathi
मित्रहो, नियमितपणे व्यायाम केल्याने आपल्या शरीराची कष्ट करण्याची क्षमता म्हणजेच धमक वाढते. समजा जर तुम्ही तुमचा मोबाईल फोन चार्जिंग केलाच नाही तर तो चालेल का? अगदी असचं आपल्या शरीराचं सुद्धा आहे, त्याला सुद्धा चार्जिंग करण्याची आवश्यकता असते. फरक फक्त एवढाच मोबाईल फोनसाठी चार्जिंग करण्याचे काम जसे त्या मोबाईलचे चार्जर करत असतो, अगदी तसेच आपल्या शरीराला चार्जिंग करायचे असेल तर रोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी, आपण कमीत कमी नियमितपणे तीस मिनिटे तरी व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्याने शरीरावर एक विशिष्ट प्रकारचे तेज येते. आपण इतरांपेक्षा आकर्षक आणि वेगळे दिसू लागतो. आपण नेहमीच्या धावपळीच्या जीवनामध्ये रोज कमीत कमी अर्धा तास ते एक तास वेळ खास आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी दिला पाहिजेत.
व्यायामाचे विविध प्रकार – Types of Exercise in Marathi
आपणा सर्वांना माहीत आहे की व्यायामाचे खूप प्रकार आहेत. परंतू, यामध्ये फक्त मुख्य चार प्रकार आहेत. समतोल व्यायाम, स्ट्रेचिंग व्यायाम, एरोबिक व्यायाम आणि अनएरोबिक व्यायाम हे चार प्रकार आहेत. व्यायामाच्या या चार प्रकारांमध्ये धावणे, पोहणे, योगासन करणे, डान्स करणे, जोर-बैठका मारणे, पुश-अप्स मारणे, दोरीउड्या मारणे आणि वजन उचलणे इत्यादी हालचालींचा समावेश होतो.
समतोल व्यायाम
व्यायामाच्या या प्रकारामध्ये व्यायाम करताना एकाच स्थितीमध्ये बराच वेळ उभे राहून आपण आपल्या संपूर्ण शरीराचा समतोल साधावा लागतो. योगासने हे या व्यायामाच्या प्रकारामध्ये येतात. आपण नियमितपणे योगासने केली तर, आपल्या शरीरातील लवचिकतेचे प्रमाण वाढते आणि आपले स्नायू देखील बलवान होतात. त्याचबरोबर, योगासने, ध्यान आणि प्राणायाम केल्याने आपला मानसिक ताणतणाव देखील भरपूर प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
स्ट्रेचिंग व्यायाम
व्यायामाचा दुसरा प्रकार म्हणजे स्ट्रेचिंग व्यायाम होय. व्यायामाच्या या प्रकारामध्ये आपल्या शरीराला दुखापत, त्रास अथवा कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, अशा स्थितीमध्ये शरीराला आणणे म्हणजे स्ट्रेचिंग करणे होय. वयोमानानुसार आणि योग्य त्या व्यायामाच्या अभावानुसार आपल्या शरीरामधील शिरा ताठतात आणि स्नायू कडक होतात.
त्यामुळे, त्या स्नायूंमधील बल व कार्य करण्याची क्षमता कमी होते. यामुळे, आपल्या शरीराला दुखापत आणि इजा होण्याची शक्यता वाढते. आपल्या शरीराला दुखापत न होण्यासाठी आपण सर्वांनी नेहमी स्ट्रेचिंग व्यायाम केले पाहिजेत. व्यायामाच्या या प्रकारामध्ये शरीराला विशिष्ट प्रकारचे ताण दिले जातात, त्यामुळे आपल्या शरीराची लवचिकता आणि शरीरातील बळ टिकून राहते.
एरोबिक व्यायाम
आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या फुफ्फुसांची, हृदयाची, स्नायूंची गती आणि शक्ती वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या व्यायामाला एरोबिक व्यायाम असे म्हणतात. व्यायामाच्या या प्रकारामध्ये रक्तवाहिन्या व हृदयरोग संबंधित रोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. एरोबिक व्यायामामध्ये पोहणे, जॉगिंग करणे, दोरी उड्या मारणे, चालण्याचा व्यायाम करणे, झुम्बा डान्स करणे, सायकल चालवणे आणि आपल्या इतर शारीरिक क्रियांचा समावेश होतो.
या व्यायामामध्ये श्वासाचे प्रमाण आणि हृदयाचे ठोके साधारणतः २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढले पाहिजे. शिवाय, हा व्यायाम नियमितपणे दररोज ३० ते ४० मिनिटे केला पाहिजे. हा व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराची कार्य करण्याची क्षमता वाढते म्हणजेच कोणतेही काम करताना लवकर थकवा येत नाही व आपण कोणतेही काम जास्तीत जास्त वेळ करू शकतो. ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हा व्यायाम करू नये.
अनएरोबिक व्यायाम
मित्रहो, आपल्या शरीरातील ताकद किंवा बल वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या विशिष्ठ अशा या व्यायामाला अनएरोबिक व्यायाम असे म्हणतात. ताकद म्हणजे कोणतेही कार्य करण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती होय. व्यायामाच्या या प्रकारामध्ये जोर-बैठका करणे, पुश अप्स करणे, वेगाने धावणे, जड वजन उचलणे इत्यादी. विविध गोष्टींचा समावेश होतो. या प्रकारामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उर्जा वापरली जाते.
त्यामुळे, अशा प्रकारच्या व्यायांमामुळे आपल्या शरीरामधील सर्व स्नायू ताकददार, मजबूत आणि पिळदार होतात. शिवाय, यामध्ये आपल्या शरीराची कॅलरीज इतर व्यायामाच्या तुलनेने जास्त जळतात त्यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो. परंतू, हृदयविकार असलेल्या व्यक्तीने हा व्यायाम करू नये.
आम्ही दिलेल्या Vyayamache Mahatva essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या exercise information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि importance of exercise in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये benefits of exercise in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट
Share this:
Leave a comment उत्तर रद्द करा..
पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.
Notify me of follow-up comments by email.
Notify me of new posts by email.
Essay Marathi
- Privacy Policy
- DMCA Policy
Get every types of Essays for students
खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi
Khelache-Mahatva-Essay-Marathi |
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 3
विद्यार्थी जीवनात अभ्यासाइतकेच खेळालाही महत्त्व आहे. पालकांच्या आता हे लक्षात आले आहे की, मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकासही झाला पाहिजे. मानवाचे संपूर्ण जीवन मन आणि शरीररूपी गाडीच्या दोन चाकांवर चालते.
शिक्षण, चिंतन, मनन, व्यक्तीचा मानसिक विकास आणि व्यायाम, खेळ, शारीरिक विकास करतात. खेळाची दोन रूपे असतात. घरात बसून खेळले जाणारे खेळ उदा. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते इ. मैदानावर मोकळ्या जागी खेळले जाणारे खेळ उदा. खो खो, क्रिकेट, फुटबॉल इ. घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांमुळे व्यायाम कमी पण बौद्धिक विकास आणि मनोरंजन होते. मैदानी खेळांमुळे शरीराला भरपूर व्यायाम होतो व मनोरंजनही होते.
'निरोगी शरीरात निरोगी मनाचा निवास असतो' शरीर अस्वथ असेल तर मनही अस्वस्थ असते. जी मुले केवळ पुस्तकातील किडे असतात त्यांचा शारीरिक विकास खुंटतो. ती चिडचिडी व सुस्त होतात. स्वत:चे रक्षणही ती करू शकत नाहीत. जी मुले अभ्यासाबरोबरच निरनिराळे खेळही खेळतात ती प्रसन्न व निरोगी राहतात.
उत्साही आणि चपळ राहिल्यामुळे शारीरिक शक्तीचा विकास होतो. यावरच मानसिक व आत्मिक विकास अवलंबून असतो. दिवसभर यंत्राप्रमाणे काम केल्यानंतर जर खेळाच्या मैदानावर मुले गेली नाहीत तर बुद्धिमान विद्यार्थीसुद्धा निर्बुद्ध होऊन जाईल. आणखी काम करण्याची इच्छा मनांत निर्माण होण्यासाठी खेळणे आवश्यक आहे.
विद्यार्थी, जीवनात फक्त अभ्यासच करीत राहू नये किंवा नुसते खेळतच बसू तये तर “Work while you work, play while you play." हे चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षण आहे. माणसाचे मन सदैव अभ्यासात गुंतलेले राहिल्यास डोके जड़ पडते आणि त्याला विश्रांतीची गरज भासते. ही विश्रांती खेळण्यामुळेच मिळते.
खेळण्यामुळे मानसिक द्वंद्व मिटते . मन हलके होऊन शरीरात नवीन ऊर्जा शक्ती येते. हाडे मजबूत होतात आणि चेहरा कांतिमान होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळ्यांची ज्योती (तेज) वाढते. शरीर वज्राप्रमाणे होते. खेळ जीवनात संजीवनी बुटीचे काम करते. खेळ मनोरंजनाचे एक चांगले साधन आहे.
जेव्हा खेळाडू खेळाच्या मैदानावर खेळतो तेव्हा तो पुलकित होतो. खेळ खेळण्यामुळे खेळाडू, स्वतः प्रेक्षकही आनंदी होतात. क्रिकेट आणि हॉकीचा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित असतात. खेळाडूची एकाग्रता खेळ व अन्य कामांत सारखीच असते.
शिक्षण घेऊन जे शिकावयास मिळत नाही ते खेळात शिकावयास मिळते. उदा. शिस्त विद्यार्थी जीवनात शिस्तीला खूप महत्त्व आहे. शिस्तीत राहूनच विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतो. शिक्षकही शिस्तीतच अध्यापन करतात. शिस्त नसेल तर शाळा कुस्तीचे मैदान बनेल.
जो संघ जितका शिस्तबद्ध असेल तितके सामना जिंकणे त्याला सोपे होते. अन्यथा हरण्याची शक्यता जास्त असते. याखेरीज खेळात परस्पर सहकार्याची भावना पण उत्पन्न होते. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघाचे खेळ वेगळे असतात व प्रत्येकाचे महत्त्वही वेगळे असते.
कप्तान संघनेता असतो. त्याच्या आदेशाचे सगळे खेळाडू पालन करतात. संघातील खेळाडूंच्या परस्पर सहकार्यामुळे संघ विजयी होतो. खेळ मनुष्याला स्वावलंबी व आत्मविश्वासू बनवितो. ज्याप्रमाणे विद्यार्थी जीवनाचे उद्दिष्ट अभ्यास करणे हे असते त्याचप्रमाणे खेळाच्या मैदानावर उतरल्यावर खेळाडूचे उद्दिष्ट आत्मविश्वासाने खेळून विजय प्राप्त करणे हे असते. विजयाची इच्छा खेळाडूला विजयी बनविते.
खेळ हा खेळाडूचा आत्मा असतो. खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळले जावेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. खेळात संघर्ष हा असतोच. त्यातून जो विजय मिळतो त्याचा आनंद खास असतो.
विजय मिळाल्यावर उत्साह वाटणे , पराजय सहन करणे व बदल्याची भावना मनात न ठेवता पराजयाच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करून जिंकण्याचा प्रयत्न करणे ही खऱ्या खेळाडूची लक्षणे होत. पराजयच यशाचा संदेश देते.
खेळांमध्ये केवळ दोन संघांमध्येच जवळीक निर्माण होते, असे नसून क्रिकेटसारख्या खेळांमुळे दोन देशांमध्ये ही जवळीक निर्माण होते. खेळ विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करतात. धनुर्विद्या, घोडेस्वारी, कबड्डी, मल्लयुद्ध यासारख्या खेळांची परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.
आजही या खेळांचे महत्त्व कमी झालेले नाही. भारत खेळांमध्ये मागे नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा, क्रिकेटचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने येथे नेहमीच होतात. जिल्हा, मंडळ, प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धा होत राहतात. विजयी खेळाडूंना पुरस्कार दिले जातात.
नव्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. खेळामध्ये नव्या गोष्टी शिकावयास मिळतात. आपल्या पराजयाची कारणे शोधून ती दूर करून पुन्हा विजय प्राप्त केला जातो. यात गुरू वा प्रशिक्षकाचे सहकार्य मिळते म्हणून भारत सरकार विजयी खेळाडूला "अर्जुन पुरस्कार" देते आणि प्रशिक्षकाला "द्रोणाचार्य पुरस्कार' देते.
शिक्षण मनुष्याला सभ्य आणि देशप्रेमी बनविते. खेळांमुळे बंधुत्व, सहकार्य, शिस्त, निष्ठा, स्वावलंबीपणा इत्यादी गुण विकसित होतात. म्हणून जीवनात खेळांचे स्थान गौण नाही. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता.
Marathi Madat
खेळाचे महत्व मराठी निबंध । Khelache Mahatva in Marathi
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी खेळाचे महत्व मराठी निबंध लिहून आलोत. जगातील कोणतीही व्यक्ती असो त्या व्यक्तीने जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत कधी ना कधी कुठला ना कुठला खेळ नक्कीच खेळला असेल खेळाचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात खेळामुळे आपल्याला निरोगी आरोग्य मिळण्यास मदत होते.
म्हणून आजच्या ” खेळाचे महत्व मराठी निबंध । Khelache Mahatva in Marathi “ या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला खेळाचे महत्व सांगणार आहोत.
प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक रोगांपासून दूर ठेवण्यासाठी निरोगी आणि तंदुरुस्त शरीर असणे खूप आवश्यक आहे. निरोगी शरीर असेल तर त्या शरीरामध्ये निरोगी मन आणि बुद्धीचा विकास होत असतो त्यासोबतच नेहमी प्रसन्न राहते व कामांमध्ये रुची लागते.
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत जसे की व्यायाम योगा आणि समतोल आहार याव्यतिरिक्त देखील शरीराला निरोगी ठेवण्याचा आणखीन एक मार्ग आहे तो म्हणजे खेळ.
शरीराला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांसाठी खेळाचे महत्व शब्दांमध्ये मांडता येणार नाही एवढे मोठे आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते त्यासोबत मनाला देखील निरोगी करण्यामध्ये खेळाची खूप मोठी भूमिका असते.
खेळ खेळत असताना आपण लहान मुलांप्रमाणे वागतो, बागडतो आणि मनसोक्त असे घेतो त्यामुळे आपले शरीराचा तर व्यायाम होतो सोबत मानाचा देखील विकास होतो आपले मन प्रसन्न राहते व निरोगी राहते. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये खेळाचे महत्त्व मोठे आहे.
वर्तमान काळामध्ये सर्वांचे जीवन हे अगदी व्यस्त झाले आहे अशा व्यस्त जीवनामध्ये खेळ आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विशेषता विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये केलेला खूप महत्त्वाचे स्थान आहे.
त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने थोडा वेळ काढून खेळ खेळल्याने त्यांना निरोगी आयुष्यासोबत प्रसन्न मन आणि मनोरंजन देखील होते.
कोणताही खेळ खेळल्याने व्यक्तीचा शारीरिक विकासासोबत मानसिक विकासही होतों. खेळ खेळत असताना आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होत असतो. खेळताना डोळे, मेंदू व शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर करावा लागतो. त्यामुळे खेळ खेळणे आपल्याला व्यायाम करण्यासाठी वैयक्तिक वेळ देण्याची देखील आवशक्यता नाही. खेळांमुळे शरीराचे संतुलनही वाढते. नियमित कोणतातरी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न राहते. शारीरिक अवयवांचा व्यवस्थित विकास होतो. मनात उल्हास आणि उत्साह वाढून आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
तसेच खेळ खेळा नंतर आपल्याला तहान आणि भूक देखील वाढते त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक तेवढी ऊर्जा मिळते. आपल्या शरीराच्या वाढीसाठी शरीराला ऊर्जा मिळणे खूप आवश्यकता आहे परंतु आपण काही काम न करता किंवा खेळ न करता एकाच जागी बसून राहिल्याने शरीराला हवी तेवढी ऊर्जा मिळत नाही त्यामुळे खेळ खेळण्याने आपल्याला तहान आणि भूक चे प्रमाण वाढते त्यामुळे शरीराला वाढीसाठी ऊर्जा मिळते.
खेळांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात काही खेळ शारीरिक तर काही मानसिक असतात. त्यालाच आपण बैठे खेळ आणि मैदानी खेळ कसे म्हणतो. शारीरिक खेळ खेळण्यासाठी शरीराला श्रम करावे लागते, तर मानसिक खेळांमध्ये मेंदूचे कार्य असते.
त्यामुळे खेळाचे जरी वेगवेगळे प्रकार असले तरी प्रत्येक प्रकाराचा फायदा हा आपल्या शरीराला होतो शारीरिक खेळामुळे आपल्या शरीराचा व्यायाम होतो तर बैठे किंवा मानसिक खेळामुळे आपल्या मेंदूच्या कार्याला चालना मिळते व आपल्या बुद्धीचा विकास होतो.
फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, क्रिके, टेनिस, कबड्डी इत्यादी शारीरिक खेळ आहेत. या खेळांना खेळण्यासाठी शारीरिक ताकत लागते. दुसरीकडे बुद्धिबळ, पत्ते, चौपट इत्यादी मानसिक खेळ आहेत, ज्यांना खेळण्यासाठी मानसिक शक्तीचा वापर करावा लागतो, म्हणजे मेंदूला चालना द्यावी लागते.
मैदानावर खेळाला जाणार खेळ कोणताही असो तो आपल्या शरीराला स्वस्थ आणि मनाला प्रसन्न करतो. खेळ मनुष्याचा व्यक्तिमत्त्व विकास करतात. त्यामुळे प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एक तास दिलेला असतो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास घडून यावा. खेळ एकमेकांमध्ये सहकार्य व बंधुता वाढवतात. खेळांमुळे परंपरा सन्मान आणि प्रेम देखील वाढते. अश्या पद्धतीने खेळ आपल्याला गुणवान, चारित्र्यवान आणि एक खरा व्यक्ती बनवतात.
खेळ आणि त्याचे फायदे । 10 Benefits of Playing Game in Marathi
खेळ खेळाचे फायदे आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे होतात. खेळाचे काही महत्त्वाचे फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे-
- त्यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य मिळते.
- खेळ हे आपल्याला वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त आणि गटामध्ये काम करणे व एकमेकांना सहकार्य करणे इत्यादी महत्वपूर्ण गोष्टी शिकवतात.
- खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास आणि सुधरवण्यास मदत करतात.
- नियमित खेळ खेळल्याने अनेक आजारापासून सुरक्षित राहण्यास मदत होते.
- नियमित खेळ खेळल्याने आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो.
- खेळ आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ हॅलो बनवते.
- खेळ आपल्यातील राग आणि चिडचिड पणा दूर करून समस्यांवर मात देण्यास शिकविते.
- खेळ आपल्याला शारीरिक बळ आणि मानसिक समर्थ देते.
- खेळामुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो.
- आपले व्यक्तिमत्त्व विकास सुधरवण्यासाठी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात.
मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” खेळाचे महत्व मराठी निबंध । Khelache Mahatva in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…
हे हि अवश्य वाचा :
- माझा वाढदिवस मराठी निबंध । My Birthday Essay in Marathi
- Refurbished म्हणजे काय? । Refurbished Meaning in Marathi
- Oyo म्हणजे काय? । Oyo Meaning in Marathi
- Artificial Intelligence म्हणजे काय? । Artificial Intelligence in Marathi
- ब्लॉग म्हणजे काय? । ब्लॉग कसा लिहितात । Blog Writing in Marathi
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
- Marathi News
- career news
- Essay On Ganesh Chaturthi In Marathi Nibandh 300 Words Pdf Ganpati Story Ganesha Celebration
Ganesh Chaturthi 2024: 'गणेश चतुर्थी'वर निबंध लिहताय? मुद्देसूद आणि वाचनीय लिखाणासाठी आवश्यक माहिती, वाचा सविस्तर
Ganesh chaturthi essay : भाद्रपद महिन्यातल्या विनायकी चतुर्थीला पासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. दिवस गणेश चतुर्थी होय या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीची घरोघरी स्थापना केली जाते. पुढील दहा दिवस त्याची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. आणि आनंदा चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सवाचे विस्तृत स्वरूप आणि त्याच्या मागील इतिहास जाणून घेऊ..
लेखकाबद्दल प्रमोद सरवळे सध्या महाराष्ट्र टाईम्समध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याने राज्यातील राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक बाबींचा चांगला अभ्यास. यापूर्वी सकाळ, लोकमत माध्यम समुहात काम केले. शैक्षणिक, व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यवहार विषयांची उत्तम जाण. डिजिटल माध्यमांत काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लिखाण केले. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. उत्तम फिचर रायटर. ... आणखी वाचा
Breaking News: मालवण पुतळा प्रकरणी आरोपी जयदीप आपटेला अटक, कल्याण येथील घरातून केली अटक
हरविंदर सिंगने गोल्ड मेडल जिंकत फडकवला तिरंगा, भारताचे चौथे सुवर्णपदक
हे तर देवेंद्र फडणवीस यांचे कारस्थान; CBIने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
स्मार्टवॉच फक्त दिसण्यासाठीच नसते, ‘हे’ 6 फायदे जाणून घ्या
पीएम मोदींच्या आधीच राहुल गांधींचा अमेरिका दौरा, आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकरणाचा नवा अध्याय!
'निक्कीला जेवण बनवून देणार नाही', जान्हवी किल्लेकरचा राडा; तर अरबाज पुन्हा होतोय पायपुसणं?
‘स्पेस टेक्नोलॉजीनं तयार केला ७० कोटींचा रस्ता’, ३ महिन्यात गेला वाहून, गुजरातमधील व्हिडीओ व्हायरल
महत्वाचे लेख
YCMOU Admission 2024: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशांना मुदतवाढ, १२४ शिक्षणक्रमांसाठी प्रवेश
BIS Recruitment 2024: पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय मानक ब्युरोत ३६५ रिक्त पदांसाठी भरती
Teacher's Day Quotes in Marathi: शिक्षक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये ‘हे’ सुविचार ठरतील महत्त्वाचे आणि मदतीचे
महाराष्ट्रातील महाविद्यालयांकडून लूट सुरूच, विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक; FRA च्या निर्णयाला केराची टोपली
विदेशी शिक्षणासाठीच्या कर्जाचे प्रमाण वाढतेय! व्हर्च्युअल बँकांमधून कर्जासाठी अर्ज करण्याचे प्रमाणही लक्षणीय
'चार लाख विद्यार्थ्यांना जर्मनीत पाठविणार', आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी दीपक केसरकरांची माहिती
झाडांचे महत्त्व मराठी निबंध, Zadache Mahatva Essay in Marathi
आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे झाडांचे महत्त्व मराठी निबंध (zadache mahatva essay in Marathi). झाडांचे महत्त्व मराठी निबंध हा मराठी माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी झाडांचे महत्त्व मराठी निबंध (zadache mahatva essay in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.
निसर्गाने आपल्याला अनेक वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली आहे आणि अशीच एक देणगी म्हणजे झाडे. वनस्पती आपल्या अस्तित्वासाठी अतिशय महत्त्वाच्या, मौल्यवान आणि आवश्यक आहेत कारण त्यांनी आपल्याला जीवनासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी प्रदान केल्या आहेत; अन्न आणि ऑक्सिजन.
झाडे आपल्या सर्वांचे चांगले मित्र आहेत कारण ते तुम्ही श्वास घेत असलेली हवा स्वच्छ करतात. त्याचप्रमाणे, ते पाणी आणि माती देखील स्वच्छ करतात आणि शेवटी पृथ्वीला एक चांगले स्थान बनवतात. हे देखील एक सत्य आहे की जे लोक झाडांजवळ राहतात ते नसलेल्या लोकांपेक्षा निरोगी, निरोगी आणि आनंदी असतात.
झाडे तुम्हाला जिवंत ठेवण्यासोबतच इतरही अनेक फायदे मिळतात. तर, वनस्पती ही सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक संसाधने आहेत. त्यामुळे जगभरातील सरकारे आणि संस्था जंगलतोड थांबवण्यासाठी आणि झाडे लावण्याचे फायदे समजावून सांगण्यासाठी पावले उचलत आहेत.
शिवाय, तुमची अनेक प्रकारे सेवा करणाऱ्या तुमच्या मित्रांची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झाडे वाचवून आपण झाडांचे नाही तर स्वतःचे भले करत आहोत. कारण वनस्पती आणि वनस्पतींचे जीवन आपल्यावर नसून आपले जीवन त्यांच्यावर अवलंबून आहे.
वनस्पती हवेतून कार्बन डायऑक्साइड घेतात आणि जीवनासाठी ताजे ऑक्सिजन श्वास घेतात. हे चक्र निसर्गाने इतर सजीवांना टिकवण्यासाठी निर्माण केले आहे. याव्यतिरिक्त, वनस्पती श्वास घेतात तो कार्बन डाय ऑक्साईड हा हरितगृह वायूंपैकी एक आहे. हे आणि इतर हरितगृह वायू, जेव्हा वातावरणात सोडले जातात, तेव्हा एक थर तयार करतात आणि सूर्यापासून उष्णता मिळवतात. यामुळे वातावरणातील तापमानात वाढ होते. यामुळे ग्लोबल वार्मिंग होते. त्यामुळे अधिकाधिक झाडे लावल्यास हवा शुद्ध होईल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी होईल.
झाडांचे महत्त्व
झाडे आपल्यासाठी अनेक प्रकारे महत्त्वाची आहेत आणि आपण त्यांचे महत्त्व दुर्लक्षित करू शकत नाही. ते महत्वाचे आहेत कारण ते तुम्हाला श्वास घेण्यासाठी ताजी हवा, अन्न आणि सूर्य आणि पावसापासून निवारा देतात. याशिवाय वनस्पतींच्या अर्कापासून बनवलेली अनेक औषधे बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय औषधी मूल्य असलेल्या वनस्पती आणि झुडपेही आहेत.
झाडे मनाला शांती देतात, ते सूर्याच्या हानिकारक किरणांना परावर्तित करण्यास आणि संतुलित तापमान राखण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, ते मातीची धूप रोखण्यास मदत करतात. ते परिसंस्थेचे व्यवस्थापन देखील करतात आणि प्राचीन काळापासून विविध प्रकारच्या वनस्पतींची पूजा करत आहेत.
एखाद्या रोपाची किंवा झाडाची बीजे वाढली की, ते आपल्या सभोवतालचे वातावरण हिरवेगार बनवते. तसेच, ते अनेक जीवन प्रकारांना समर्थन देते. पक्षी त्यांची घरटी बांधतात आणि अनेक सरपटणारे प्राणी आणि प्राणी त्यामध्ये किंवा जवळ राहतात.
याशिवाय वनस्पतीचे अनेक भाग जसे की मुळे, पाने, देठ, फुले, बिया हे देखील खाण्यायोग्य आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते त्यांच्या सेवा आणि भेटवस्तूंच्या बदल्यात कधीही काहीही मागत नाहीत. झाडे पर्यावरण आणि पर्यावरणाचा समतोल राखतात.
झाडांचे पर्यावरणात योगदान
अन्नसाखळीत योगदान.
वनस्पती समृद्ध आणि निरोगी पर्यावरणात योगदान देतात. प्राणी, कीटक, पक्षी त्यांचे घर झाडांमध्ये बनवतात आणि विविध परिसंस्था तयार करतात. हे संतुलित वातावरण, यामधून, मानवी कल्याणासाठी योगदान देते. वनस्पती स्वतःचे अन्न बनवतात आणि अन्नसाखळीच्या तळाशी आढळतात. ते प्रकाशसंश्लेषण नावाच्या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात आणि संपूर्ण परिसंस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. या व्यतिरिक्त, वनस्पती हे औषधाचा एक समृद्ध स्त्रोत आहेत ज्याचा उपयोग आयुर्वेदाप्रमाणे नैसर्गिक मार्गाने आपले रोग बरे करण्यासाठी केला जातो.
पाणी धरून राखण्यात योगदान
झाडे पावसाचे पाणी घेतात आणि जमिनीत साठवून ठेवतात. त्यामुळे स्वच्छ पाणी नाल्यांमध्ये वाया जाण्यापासून वाचले आहे. याव्यतिरिक्त, ते पाणलोट म्हणून काम करतात आणि पृथ्वी आणि वातावरणात हळूहळू सोडण्यापूर्वी काही काळ पुराचे पाणी राखून ठेवतात. त्यामुळे ते एखाद्या भागातील पाण्याचा आधार घेतात आणि आम्हाला पाण्याची सोय देतात. झाडे पाऊस आणि पुराच्या वेळी माती वाहून जाण्यापासून प्रतिबंधित करते, त्यामुळे भूस्खलन आणि मातीची धूप रोखते.
चांगले पर्यावरण
वनस्पती आपल्याला ताजी हवा, पाणी आणि अन्न देतात. उन्हाळा आणि पावसाळ्यातही झाडे थंड सावली देतात. हिरवाईने वेढलेल्या ठिकाणी मुलांना सुद्धा राहायला आवडते. हिरवळीच्या संपर्कात आल्यावर रुग्ण सहज बरे होतात. इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे झाडाला चांगले जीवन मिळते.
झाडे फळे, औषधे तयार करतात जी अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात आणि अशा प्रकारे आर्थिक विकासास हातभार लावतात. झाडांची लागवड करून त्यांचे उत्पादन विकून लोकांना उपजीविका करण्यास मदत होते. झाडे लाकूड आणि कागद देतात.
झाडे आपल्या जीवनात खूप महत्वाची आहेत आणि ते पर्यावरणाची अखंड सेवा देतात. आम्ही त्यांचे संरक्षण केले नाही आणि म्हणूनच कदाचित आज आपण ग्लोबल वॉर्मिंग, गंभीर प्रदूषण आणि जंगलतोडीच्या इतर प्रतिकूल परिणामांमुळे प्रभावित आहोत. या पृथ्वीवरील मानवी अस्तित्वासाठी वृक्षांचे संगोपन आणि संगोपन करणे आवश्यक आहे. आपण इतरांना अधिकाधिक झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी वनस्पती खूप महत्वाच्या आणि फायदेशीर आहेत. त्यांच्याशिवाय, पृथ्वीवरील जीवन कठीण होईल आणि काही काळानंतर पृथ्वीवरील प्रत्येक प्रजाती ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मरण्यास सुरवात होईल. त्यामुळे आपण आपले जीवन वाचवण्यासाठी झाडांचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे आणि आपल्या मुलांना झाडांचे महत्त्व शिकवले पाहिजे.
तर हा होता झाडांचे महत्त्व मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास झाडांचे महत्त्व मराठी निबंध हा लेख (zadache mahatva essay in Marathi) आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
संगणक चे महत्त्व मराठी निबंध | Computer Essay in Marathi | MarathiGyaan
संगणक चे महत्त्व मराठी निबंध | computer essay in marathi | sanganak che mahatva essay in marathi.
तुम्हा सर्वान साठी संगणक चे महत्त्व मराठी निबंध (sanganak che mahatva essay in marathi) लिहिला आहे. या निबंध मध्ये संगणक व त्याचे महत्व (Computer Essay in Marathi) या विषय वर चर्चा केली आहे.
या निबंध चे शीर्षक "संगणकाचे अधिराज्य" किंवा "संगणक ब त्याचे महत्त्व" किंवा "संगणक - काळाची गरज" पण असू शकते हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.
संगणक चे महत्त्व मराठी निबंध
आज संगणकाविना कुणाचेही पान हलत नाही. संगणकाचा जन्म पाश्चिमात्य देशात झाला. चार्लस् बॅबेज हा संगणकाचा जन्मदाता. इ. स. १८३२ मध्ये म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी जन्माला आलेले हे बाळ भलेभक्कम आणि मोठे होते. त्याची कार्यक्षमताही मर्यादित होती. पण हा गुणी बाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा आकार अधिकाधिक लहान होत गेला आणि कर्तृत्वाच्या कक्षा मात्र सतत रुंदावतच गेल्या. म्हणून तर आज हा संगणक आपले अधिराज्य सर्वत्र स्थापू शकला आहे.
एकविसावे शतक हे ' ज्ञानयुग' आहे आणि या ज्ञानयुगाचा कळस म्हणजे संगणक ! आज या संगणकाला ' अशक्य ' हा ' शब्द माहीत नाही. एके काळी संगणक ही फक्त शास्त्रज्ञांची मक्तेदारी होती. पण आज तो जनसामान्यांचा सेवेकरी झाला आहे. आपण प्रवासाला निघतो तेव्हा आपल्या प्रवासातील रेल्वेच्या वा विमानाच्या तिकिटांचे आरक्षण संगणक करतो. आपल्या घरात दरमहिन्याला येणारी विजेची व दूरध्वनीची बिले, विम्याचा हप्ता भरण्याची सूचना देणारी स्मरणपत्रे संगणक तयार करतो. संगणकाने सर्व कामे सोपी, सुलभ आणि शिस्तीची केली आहेत. आणि आता तर मोबाईलमध्ये संगणक अवतरल्यामुळे दैनंदिन कामे विलक्षण वेगात व कार्यक्षमतेने करता येऊ लागली आहेत. त्यामुळे अखंड जगच खिशात आले आहे.
मोठमोठ्या संस्था, कारखाने, कचेऱ्या येथील बिले तयार करण्याची कामे संगणक करतात. शालान्त परीक्षा आणि इतर अनेक मोठमोठ्या परीक्षांचे निकाल संगणक तयार करतो. मोठमोठी पुस्तके, ग्रंथ अगदी सहजगत्या चुटकीसरशी संगणकाच्या साहाय्याने छापले जातात. बँका, विमा कंपन्या, शेअर्स कचेर्यांमधील हिशेब संगणक क्षणात बिनचूक करतात.
सध्याच्या विज्ञानयुगात सतत संशोधन चालू असते. या संशोधनाला संगणक मोठे साहाय्य करतो. या युगातील अंतराळविज्ञानाला संगणकाचा आधार लाभला आहे. अंतराळात उपग्रह सोडण्यास संगणकाने मदत केली आहे. हवामानाचा ' अंदाज, दूरदर्शनवरील चित्रदर्शन अशी किती कामे सांगावीत या संगणकाची ! इंटरनेटसारख्या चमत्काराने तत जग जवळ आणण्याचे महान कार्य केले आहे. आज कोणतेही क्षेत्र संगणकाच्या स्पर्शापासून दूर राहू शकत नाही, इतके या संगणकाचे माहात्म्य वाढले आहे.
असे या संगणकाचे अधिराज्य सर्वत्र आहे. म्हणून या संगणकाचे आपण गुलाम झालो आहोत काय? असा प्रश्न पडतो. पण विचारांती या प्रश्नातील फोलपणा लक्षात येतो. एक गोष्ट नक्की की, या संगणकाचा निर्माता माणूस आहे. माणूसच संगणकाला माहिती ब आज्ञावली देतो. अंतिमतः या अधिराज्याचा दूरस्थ नियंत्रक माणूसच आहे !!
तर हा होता संगणक चे महत्त्व मराठी निबंध (importance of computer essay in marathi) तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.
मानव व वैज्ञानिक प्रगती मराठी निबंध
विज्ञान आणि मानव मराठी निबंध
दूरदर्शन शाप की बरदान मराठी निबंध
झाडांवर मराठी निबंध
You might like
I like this composition of Marathi and I write in my book for a reading anytime it is interesting so that is good passage. Thank you for posting this passage that's all thank you
Bhayy englishh 👍😂
Post a Comment
Contact form.
- जीवन चरित्र
- ज्ञानवर्धक माहिती
- पक्षी माहिती
- प्राणी माहिती
[वाचनाचे महत्व] वाचाल तर वाचाल निबंध मराठी | Vachanache Mahatva Essay in Marathi
वाचनाचे महत्व मराठी निबंध | essay on importance of reading in marathi.
1) वाचाल तर वाचाल निबंध | Vachal tar vachal Marathi Nibandh
जीवनात यश, सम्मान व ओळख मिळवण्यासाठी शिक्षण खूप उपयुक्त आहे व शिक्षणात एक महत्वपूर्ण भाग पुस्तके बजावत असतात. कारण पुस्तके आपल्याला ज्ञान देतात. पुस्तके आपले चांगले मित्र असतात. पुस्तके वाचनाने ज्ञान सोबत मनोरंजन पण होते. आपल्या नित्य शैलीत आपण दररोज काही न काही वाचत असतो. अध्यायनातून लक्षात आले आहे की पुस्तके वाचनाने आनंद निर्माण होतो. फ्रांसईस बेकन या महान लेखकानी लिहिले आहे की वाचन व्यक्तीला पूर्ण करते.
पुस्तके वाचनाने आपण जगाबद्दल ज्ञान प्राप्त करू शकतो. वाचनाने नव नवीन गोष्टी शिकायला मिळतात. वाचनाचा महिमा महान लोकानी सांगितला आहे. एकदा लोकमान्य टिळकानी सांगितले की जर त्यांना वाचनासाठी पर्याप्त पुस्तके उपलब्ध झाली तर ते नरका मध्ये पण आपले जीवन काढून घेतील. पुस्तकाने ज्ञान मिळते व ज्ञानाने आत्मसम्मान वाढतो.
आजच्या या व्यस्त जीवन शैलीत प्रत्यकला पुस्तके वाचने संभव होत नाही. परंतु एक सुसंस्कृत व्यक्ति साठी पुस्तके नेहमीच आंनद व ज्ञानाचा स्त्रोत राहतील. वाचकांसाठी काही पुस्तके वाचन हानिकारक असू शकते. अश्या पुस्तकाना वाचण्यापासून वाचायला हवे. शुद्ध आणि पवित्र पुस्तके वाचन करायला हवीत.
ज्याचा छंद वचन करणे असतो असा व्यक्ति कधीच एकता राहत नाही. पुस्तके आपली सर्वात चांगली मित्र असतात. ते आपल्याला ज्ञान तर देतात पण त्यासोबतच आपले मनोरंजन पण करतात. वाचन प्रेमीसाठी एकटेपणाची समस्या नसते. आनंदासाठी वाचने मजबूरी मध्ये वाचनापेक्षा चांगले असते. जेव्हा आपण मजबूरी मध्ये वाचन करतो तेव्हा त्याचा काहीही फायदा आपल्याला होत नाही. म्हणून तुम्ही काहीही वाचन करत असाल तर संपूर्ण चित्त देऊन, आंनदाने वाचा. वाचनाची आवड लहानपणापासूनच जोपासली गेली पाहिजेल. पालकांनी आपल्या मुलांना वाचनाचे महत्व समजाऊन त्याच्यात वाचनाची गोडी निर्माण करायला हवी.
Also Read माझा आवडत छंद वाचन
2) वाचनाचे महत्व निबंध | vachanache mahatva in Marathi
वाचन ही एक बहुमूल्य सवय आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात यश व आत्मसंमान प्राप्त करायचं आहे त्यांनी पुस्तक वाचन करायला हवे. वचन व्यक्तीच्या शक्तीला योग्य दिशा प्राप्त करून देते. वाचन कल्पनाशक्ती वाढवते. व्यक्तिमध्ये धैर्य चा संचार करते. तुम्ही प्रवासवरील पुस्तके वाचून पूर्ण जगाचा प्रवास करू शकतात.
वाचन आपल्याला भरपूर लाभ मिळवून देते, आपली रचनात्मकता वाढवते, जीवनाला सकारात्मक दिशा प्रदान करते. वाचन करणार व्यक्ति वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. वाचन सामाजिक रूपाने चांगला नागरिक घडवते. वाचनासोबत तुम्ही विवध क्षेत्र जसे संस्कृति, कला, इतिहास इत्यादि क्षेत्राची माहिती मिळवू शकतात. वाचनामुळे तनाव दूर होतो.
वाचनामुळे लांब प्रवासात तुम्ही आनंद मिळवू शकतात. प्रवास दरम्यान पुस्तके वाचनाने व्यक्ति बोर होत नाही व वेळ पटापट संपतो. आजच्या मोबाइल व संगणकाच्या काळात वाचनाचे प्रमाण कमी हॉट आहे. आई वाडीलाना आवश्यकता आहे की त्यांनी आपल्या मुलाना वाचनाचे महत्व समजावून वाचनाची सवय विकसित करायला हवी. वाचन बुद्धीला कुशलता प्रदान करते, प्रत्यक परिस्थिति ला सांभाळण्याची क्षमता प्रदान करते. म्हणून सोशल मीडिया व गेम खेळण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कमीत कमी एक तास पुस्तक वाचन करायला हवे.
WATCH VIDEO:
टिप्पणी पोस्ट करा
- Birthday Wishes in Marathi
IMAGES
VIDEO
COMMENTS
2. Khelache mahatva in marathi: मित्रांनो आजच्या या लेखात आपण खेळांचे महत्व पाहणार आहोत. जगात कोणताही व्यक्ति असो त्याने कधी न कधी कोणता न कोणता खेळ ...
तुम्हा सर्वान साठी जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध लिहिला आहे (khelache mahatva essay in marathi) . या निबंध मध्ये खेळाचे आपल्या जीवनात काय महत्व आह
खेळाचे महत्व निबंध मराठी - Khelache Mahatva in Marathi Essay. अभ्यासाइतकेच जीवनात ...
March 6, 2024 by marathischool. Jivanatil KhelaChe mahatva essay in Marathi language - लहानपणी आपला बराचसा वेळ हा खेळण्यात जातो. पण लहानपणचे बहुतेक खेळ हे गमतीखातर खेळले जातात. त्यांत ...
जीवनात खेळाचे महत्व मराठी निबंध | jivanat Khelache mahatva in marathi खेळ असावा निखळ. jivanat Khelache mahatva in marathi: खेळ म्हणजे क्रीडा. करमणुकीचे साधन.
शालेय जीवनात खेळाचे महत्त्व | Shaley jivanat khelache mahatva in marathi By ADMIN रविवार, १२ एप्रिल, २०२०
Published on: April 24, 2023 by Marathi Essay खेळाचे महत्व मराठी निबंध खेळ हा नेहमीच मानवी संस्कृतीचा आणि समाजाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.
शिक्षणक्रमात खेळाचे महत्त्व मराठी निबंध | shikshankramat khelache mahatva essay marathi ...
मुख्यपृष्ठ सामाजिक विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्व - Vidyarthi Jivanatil Khelache Mahatva - Importance Of Sports In Student Life Essay In Marathi. विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्व - Vidyarthi Jivanatil Khelache Mahatva - Importance Of Sports In ...
1 व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी - Vyayamache Mahatva Essay in Marathi. 1.1 व्यायाम म्हणजे नेमकं काय - Exercise Information in Marathi. 1.2 निरोगी जीवनासाठी व्यायामाचे महत्त्व ...
वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय. हे सर्व निबंध मराठी भाषेतील ...
1) व्यायामाचे महत्त्व निबंध | vyayamache mahatva in marathi. (250 शब्द) मनुष्य तेव्हाच सुखी राहू शकतो जेव्हा त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असेल. स्वस्थ ...
खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay Marathi नमस्कार मित्र ...
खेळाचे महत्व मराठी निबंध । Khelache Mahatva in Marathi. नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी खेळाचे महत्व मराठी निबंध लिहून आलोत.
खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahtwa Marathi Nibandh | Marathi Essay On Importance Of SportsThis channel is Powered by Pixel Blaze Filmworks.If you ...
Essay on khelache mahatva in marathi Get the answers you need, now! ektarai5281 ektarai5281 04.11.2017 India Languages Secondary School answered • expert verified Essay on khelache mahatva in marathi See answers Advertisement Advertisement Shaizakincsem Shaizakincsem
खेळाचे महत्त्व मराठी निबंध | khelache mahatva marathi nibandh | khelache mahatva marathi essay# ...
खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache Mahatva Essay in Marathi | जीवनात खेळाचे महत्व मराठी निबंध🟪 ...
Essay On Ganesh Chaturthi In Marathi Nibandh 300 Words Pdf Ganpati Story Ganesha Celebration; Ganesh Chaturthi 2024: 'गणेश चतुर्थी'वर निबंध लिहताय? मुद्देसूद आणि वाचनीय लिखाणासाठी आवश्यक माहिती, वाचा ...
वेळेचे महत्त्व समजून त्यानुसार आपली सर्व कार्य करायला हवीत. ***. 2) वेळेचे महत्व निबंध -Veleche Mahatva Nibandh Marathi. (220 words) वेळ, वेळेचे चक्र असे असतो जे ...
झाडांचे महत्त्व मराठी निबंध, Zadache Mahatva Essay in Marathi. निसर्गाने आपल्याला अनेक वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली आहे आणि अशीच एक देणगी म्हणजे झाडे ...
तुम्हा सर्वान साठी संगणक चे महत्त्व मराठी निबंध (sanganak che mahatva essay in marathi) लिहिला आहे. या निबंध मध्ये संगणक व त्याचे महत्व (Computer Essay in Marathi) या विषय वर ...
2) वाचनाचे महत्व निबंध | vachanache mahatva in Marathi. वाचन ही एक बहुमूल्य सवय आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात यश व आत्मसंमान प्राप्त करायचं आहे त्यांनी ...